TOD Marathi

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला धोकादायक झाले आहेत. त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार केला पाहिजे असं वक्तव्य बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. मोदींनी मणिपूरमध्ये मैतेई जातीला आदिवासींचा दर्जा का दिला? तशी मागणी होती का? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं पाहिजे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच आगामी लोकसभा निवडणुका आपण अकोल्यातूनच लढणार आहोत असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाविरोधातल्या इंडिया या आघाडीच्या विरोधात वक्तव्य केलं. या आघाडीत एसटी, एससी, ओबीसी नाहीत. माझ्यासारखे भाजपाच्या विरोधात असणारे तुम्ही का घेत नाही? असाही प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. मुंबईत भाजपा विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीचे कुठलही निमंत्रण मला देण्यात आलेलं नाही. मुंबईतल्या बैठकीच्या निमंत्रणाची मी वाट पाहतो आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा ” …फडणवीसांचा २० ऑगस्टपासून जपान दौरा; महाराष्ट्र आणि जपान मैत्रीसंबंधांचा नवा अध्याय”

दरम्यान माझी माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्याशी घरगुती संबंध होते, अशोक चव्हान यांच्याशीही माझे घरगुती संबंध आहेत त्यांच्याशी माझा राजकारणापलिकडचा संवादा आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीत माझा समावेश करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. उद्धव ठाकरे हे शब्दाचे पक्के आहेत. उद्धव ठाकरे हे कमी बोलतात पण ठोस बोलतात असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. औरंगजेबाच्या मजारीविषयी प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं. आम्हाला दंगल थांबवायची होती म्हणून आम्ही तिथे गेलो होतो असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.